(भारत सातपुते यांच्या उपस्थितीत कवी संमेलन)
(भारत सातपुते यांच्या उपस्थितीत कवी संमेलन)
महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभागाने निर्देशित परिपत्रकानुसार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दयानंद कला महाविद्यालयात मराठी भाषा व वाङ्मय विभागाच्या वतीने 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' १४ जानेवारी ते २८ जानेवारी या दरम्यान साजरा होत आहे. यानिमित्त कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते .याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कवी भारत सातपुते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड तर महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ.अंजली जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे भारत सातपुते यांनी आपल्या विनोदी विडंबनात्मक शैलीत आपल्या कविता सादर केल्या .त्यातून ग्रामीण जीवन ,तरुणाची अवस्था, ऐतिहासिक वारसा ,यांच्यावर भाष्य करणाऱ्या कविता सादर करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. डॉ. अंजली जोशी यांनी मराठी साहित्य हे विविध आभूषणे परिधान करून सौंदर्य वाढवीत आहे .नवोदित कवीना मराठी भाषेतून कविता लेखन करण्यास भरपूर वाव आहेअसे मत मांडले अध्यक्षीय समारोपात डॉ.शिवाजी गायकवाड यांनी महाविद्यालयातील जीवनातच नवोदित कवींची निर्मिती होत असते विद्यार्थ्यांचा जीवनानुभव विद्यार्थी आपल्या कवितेतून अभिव्यक्त करीत असतात .भावनांचा अविष्कार म्हणजे कविता असते.असे मत व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपले काव्यवाचन केले त्यामध्ये प्राध्यापकांनीही सहभाग नोंदविला होता.मराठी विभागातील डॉ. अंकुश कुमार चव्हाण,डॉ. सुभाष कदम, प्रा. राजकुमार मोरे, प्रा.अंगद भुरे, प्रा.स्नेहा वाघमारे, प्रा. विद्या गिराम उपस्थित होते. व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा अंगद भूरे यांनी तर आभार व्यंकट पांचाळ यांनी मानले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0